![Sanjay Raut on Ashok Chavan](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-9.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली : महाराष्ट्राला संधी मिळाली, तर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील. त्यांना शरद पवार यांच्यासह देशातील नेते पसंती देतील, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे उमदे आहेत. निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील. निवडणूक झाल्यानंतर आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसतील. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी असे नाही. आघाडीतील सर्वजण उद्धव ठाकरेंना पसंती देतील. विशाल पाटील समजूतदार आहेत. ते वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. जेव्हा जेव्हा देश, देशाचे स्वातंत्र्य संकटात आले, तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी देशाच्या शत्रूंशी युद्ध केले. विशाल पाटील यांचा डीएनएही तोच आहे. त्यांच्याशी माझा उत्तम संवाद आहे. त्यामुळे सांगलीत एकास एक लढत होईल. विशाल पाटील यांची चिंता तुम्ही करू नका. त्यांची चिंता आम्ही करू. ते आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आम्ही 22 तारखेपर्यंत वाट बघू.