Maharashtra Political Crisis : शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, न्यायालयात सिंघवी यांचा जोरदार युक्तीवाद

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, न्यायालयात सिंघवी यांचा जोरदार युक्तीवाद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिस-या दिवशीही सुनावणी सुरू आहे. जेवणाच्या सुट्टीनंतर ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून युक्तीवाद सुरू आहे. शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, यावर सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis : सिंघवी म्हणाले, शिंदे गटाची कृती ही पक्षाच्या आदेशाची उल्लंघन करणारी आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या दोन्ही कलमांतर्गत शिंदे यांच्या कृतीला हा कायदा लागू होतो. 2 1 A या कलमांतर्गत पक्षांतर बंदी कायदा सरळसरळ लागू होतो, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी राजेंद्र सिंह यांच्या प्रकरणाचा हवाला दिला. तसेच घडलेला घटनाक्रम पुन्हा एकदा सांगितला. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या या घटना दूर्मीळ आहेत. शिंदे गटाकडून दहाव्या सूचीचं उल्लंघन करण्यात आले आहे, असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला आहे.

शिंदे गटाचा बचाव अशक्य

शिंदे यांच्या कृतींमधून त्यांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. हे स्पष्ट दिसून येते, असे म्हणत शिंदे आणि त्यांच्या गटाचा बचाव अशक्य आहे. घडलेल्या घटना खोट्या आहेत असा दावा शिंदे यांनी केला तर आणि तरच त्यांचा बचाव होऊ शकतो. अन्यथा त्यांच्या कृतीअनुसार पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होतो. विशेष म्हणजे कायद्याच्या दोन्ही कलमांतर्गत त्यांना हा कायदा लागू होतो, असा जोरदार युक्तीवाद अभिषेक मनु सिंघव यांनी केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news