टोप ; पुढारी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवार) पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाणे येथून चंदगड कोल्हापूरच्या दिशेने एसटी बस येत होती. आज सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टोप येथील बिरदेव मंदिरा समोरील वळणावर बस आली असता, यावेळी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला घासून महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पुढे लोखंडी संरक्षक ग्रिल तोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन उलटली. यावेळी बस मधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते.
अपघात झाल्यावर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :