![राजधानीत महिला दिनानिमित्त तीन तेजस्विनींच्या मुलाखती, ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे आयोजन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2FDelhi-1-scaled.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जीवाला धोका निर्माण होतो. पण ते अनुभव समृद्ध करणारे असतात. महिला म्हणून काही वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला का, या प्रश्नाचे सरसकटीकरण झालेले आहे. महिला – पुरुष असा भेदभाव न करता काम केले पाहिजे. क्रीडा क्षेत्रातही महिला विशेष कामगिरी करत आहेत. आपण जे काम करतो तो एकप्रकारे यज्ञच आहे.
-सुजाता चतुर्वेदी, सचिव, क्रीडा विभाग
हिडिंबा, चित्रलेखा , कुंती, उलुपी, रुख्मिणी या पाचही पौराणिक व्यक्तिरेखा कायम दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. स्वतःच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले. त्यामुळे महाभारताला वेगळे वळण मिळाले. या एकप्रकारे बंडखोर व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्याविषयी लिहिताना मला हे जाणवले आणि लेखिका म्हणून चौकटीबाहेर विचार करण्याची सवय लागली.
– अर्चना मिरजकर, लेखिका आणि जनसंपर्क तज्ञसंघर्ष म्हणजे एकप्रकारे आपला स्वतःचा होत जाणारा विकास असतो. लोकांना भेटणे, नेटवर्किंग याकडे कोणी नकारात्मकतेने बघतात. मात्र जास्तीत जास्त लोकांना भेटले पाहिजे. कौटुंबिक जीवनात सुखी असलेच पाहिजे. पण फक्त त्यालाच आपण सर्वस्वी यश समजता कामा नये, अस मला वाटते.
– ज्योतिका कालरा, सदस्या, राष्ट्रीय महिला आयोग