नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'चलो दिल्ली मार्च' अंतर्गत पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कुच करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार आणि शेतकरी अशा दोन बैठका झाल्यानंतर ठोस काही निष्पन्न न झाल्याने आज दुपारच्या सुमारास पोलीस पंजाब हरियाणाच्या सीमेवरील शंभू बॉर्डरवर प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. दरम्यान, या आधीच विविध राज्यातून दिल्लीत येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. Chalo Delhi March