![Nagraj Manjule](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2FNagraj-Manjule-Upcoming-film-tar.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सैराट', 'फॅन्ड्री', 'नाळ', 'झुंड' यासारख्या दर्जेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'घर बंदुक बिर्याणी' चित्रपट घेवून आले आहेत. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी थिअटरमध्ये रिलीज होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटातील नागराज यांचा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेचे कौतुक केले. दरम्यान एका मुलाखतीत नागराज ( Nagraj Manjule ) यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती सांगितली आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagraj Manjule ) यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत शॉर्टफिल्मसाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला माहिती सांगितली आहेत. इतक्या वर्षानंतर त्यांनी या धक्कादायक वृत्ताची माहिती समोर आणली आहे. मंजुळे यांनी सांगितले की, 'पिस्तुल्या' या शॉर्टफिल्मसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि माझ्यावर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता. मात्र, यानंतर मी आमच्या टिमसह पुढील 'फॅन्ड्री' चित्रपटाचे शूटिंग करण्यात बिझी झालो. या चित्रपटाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस असल्याने माझी आई आणि बहिण चित्रपटाचे शुटिंग पाहण्यास सेटवर आल्या होत्या. याच संधीचा फायदा घेवून चोरानी घरातील कपाटातील मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरून नेला. चोरांनी घरात कोणी नसल्याचे पाहून पुरस्कार नेल्याचेही ते म्हणाले.'
यापुढे ते म्हणाले की, 'चोरांनी पुरस्कार नेला. परंतु, मी त्यावेळी पुरस्कार शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण, जर पुरस्कार शोधण्यात माझा वेळ घालवला असता तर मी माझ्या कामापासून बाजूला पडलो असतो. चित्रपटाच्या शूटिंगसह कामावर माझे दुर्लक्ष झाले असते. यांचा परिणाम मला पुढे भोगावा लागला असता. म्हणून मी पुरस्कार शोधला नाही. चोरांनी फक्त पुरस्कारांची ट्रॉफी चोरून नेली, मात्र, त्या पुरस्कारावरचं नाव तर माझेच राहणार आहे. यासाठी खूप वेळ गेला असता हे मला नको होतं. परंतु, माझे नशीब चांगले की, मला पुढील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.' असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :