![उद्धव यांना तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय काही येत नाही : देवेंद्र फडणवीस](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2F17-3-16.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काहीही येत नाही. मी उद्धव ठाकरे यांचे भाषण तुम्हाला जसेच्या तसे म्हणून दाखवू शकतो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाचे एक काम दाखवावे. 25 वर्षे मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता होती. त्यांनी मुंबईतील एक काम दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
फडणवीस म्हणाले, शरद पवार यांना नैराश्य आले आहे. त्यातून ते शिवीगाळीवर आलेे आहेत. जेव्हा जेव्हा ते मोदींना शिव्या देतात तेव्हा आमचाच मोठा विजय झाला आहे. बजरंगबली बुद्धी आणि शक्ती दोन्ही देतात. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आमच्यासाठी बुद्धी मागितली आणि विरोधकांना सद्बुद्धी मागितली आहे, असा टोला त्यांनी लगावला.