भाजपने मुद्रा योजनेच्या माध्यमातून २० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले, पूर्वी या योजनेच्या माध्यमातून १० लाखांपर्यंत दिले जात होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी ३ कोटी नवे घर बनवले जातील, यापूर्वी ४ कोटी घरे गरिबांसाठी बनवल्याचे सरकारने सांगितले आहे, ८० कोटी लोकांना मोफत अन्न योजना २०२९ पर्यंत लागू राहील. प्रधानमंत्री उज्वला योजनेतून १० कोटी घरी गॅस कनेक्शन दिले, ही योजनाही पुढे सुरू राहील. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबविली जाईल. 5 जी सेवेचा विस्तार करण्यात येईल. यापूर्वी एक कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवल्याचे सरकारने सांगितले, आता हे लक्ष्य वाढवून तीन कोटी करणार असल्याचे भाजपने सांगितले. यापूर्वी सुरू असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क उपचार प्रदान करण्यात येतील. तृतीयपंथी समुदायाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ६३ लाख पेक्षा अधिक लोकांना शहरी भागात कर्ज दिले. आता या योजनेतून आता ग्रामीण भागातील फेरीवाले आणि तत्सम लोकांना लाभ देण्यात येईल. रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार असून यापूर्वी असलेल्या वंदे भारत ट्रेनसह आधुनिक कोचेस आणि गाड्या वाढवण्यात येतील. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, भारतात विमानसेवा या योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे.