अमरावतीसह चार ते पाच जिल्ह्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष मजबूत आहे. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. फार कमी मतांनी पराभव झाला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतच चर्चा केली जाईल. आपण भाजपचे थेट मित्र नाही, तर भाजपचे मित्र असलेल्या एकनाथ शिंदे यांचे मित्र आहोत, असेही कडू म्हणाले.