अजित पवारांना फोन केलाच नाही; नुतन खासदार सोनवणेंचा दावा

खा.बजरंग सोनवणे
खा.बजरंग सोनवणे

गौतम बचुटे/केज (बीड)  बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे टविट् अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी केले होते. या नंतर खा.बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकावून लावत आपण मरे पर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू. असे स्पष्ट शब्दात सांगून टाकले.

अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' अशा आशयाचं ट्वीट आ. अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रकरणावर खा. बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत, म्हटले आहे की, मी मरे पर्यंत शरद पवार साहेबां सोबतच राहणार आहे. असं स्पष्ट केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्वीट केल्या नंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना म्हणाले, की, अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्या नंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावं. बजरंग सोनवणे म्हणाले की, शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार साहेबांच्या गटात येणार किंवा त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यात येणार, हे जे काही मिटकरींनी ट्वीट केलं आहे ते साफ खोटं आहे. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबतच असणार आहे. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत. असा इशारा त्यांनी दिला. तर अमोल मिटकरी यांनी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा. असा टोलाही खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी त्यांना लगावला.

काय म्हणाले सोनवणे…

'मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो. ते असा संभ्रम का पसरवत आहेत. हे त्यांनाच विचारायला हवं. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहेत ? या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात. ते तुम्ही राजकारणात आणताय. मिटकरी हे अतिशय चुकीचं करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत; ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय, मला माहित नाही. त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्या नंतर दुसऱ्यांच्या उद्धिष्टाला हात घालावा. ही माझी विनंती आहे. मी जिवंत असे पर्यंत मी शरद पवार साहेबां सोबतच राहणार', असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news