1950 ते 2013 पर्यंत देशाचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 7200 होती. पण 2013 पासून आतापर्यंत 24 लाख कुटुंब तेही हिंदू कुटुंब ज्यांची मालमत्ता किमान 50 कोटी असेल अश्याना देश मजबूर करून देश सोडायला लावल. त्यांनीही नागरिकत्व सोडल आणि परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारल. देशाचं नागरिकत्व सोडणारा वर्ग हा संत परंपरेला मानणारा होता, त्यांच्यासमोर अशी परिस्थिती केली की त्यांना नागरिकत्व सोडाव लागल. हिंदूंच्या राज्यात हिंदूंना देश सोडून जावं लागत, नागरिकत्व सोडून जावं लागत ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे, अशीही टीका आंबेडकर यांनी केली. शेतकऱ्यांचा दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे, असही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.