सेमीफायनल त्यांनी जिंकला, फायनल मात्र आम्हीच जिंकणार : विजय वडेट्टीवार | पुढारी

सेमीफायनल त्यांनी जिंकला, फायनल मात्र आम्हीच जिंकणार : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मागच्या वेळी क्रिकेटमध्ये सेमीफायनल आम्ही जिंकलो पण फायनल हरलो. तसेच आता सेमीफायनल ते जिंकले मात्र फायनल आम्ही जिंकू असा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर ते माध्यमांशी बोलत होते. काँगेस पक्षाने राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचंड मेहनत घेतली

मात्र, आम्ही या पराभवाने खचून जाणार नाही.आम्ही लोकशाही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत. यापुढेही लढत राहू,भाजप बरोबर त्यांचे मित्र पक्ष लढले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे देखील मित्र पक्ष लढले.धार्मिक ध्रुविकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तेलंगणा विजय संदर्भात भारत जोडो यात्रेचा फायदा तेलंगणामध्ये झाला. राहुल गांधी यांनी चौदा दिवस तिथे यात्रा केली, ही यात्रा मैलाचा दगड ठरली, मतदारांनी कौल दिला.तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना तुरुंगात पाठवले, मुलीच्या लग्नाला फक्त दहा दिवस जामीन मिळालं ह्यातून लोकांच्या मनात राग होता,या मेहनतीने तेलंगणामध्ये विजय मिळाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button