वर्ध्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समीर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे पुढे यांनी सरकारचा कंत्राटी पदभरतीचा जीआर काढल्याबद्दल निषेध नोंदविला. वाघ नख वगैरे करा पण, सोयाबीन, कपाशीवरही चर्चा करा. आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात, कपाशीला बारा हजार रुपये भाव देण्यास कटीबद्ध राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.