जनतेपासून, वास्तवतेपासून सरकार दूर : खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

जनतेपासून, वास्तवतेपासून सरकार दूर : खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
Published on
Updated on
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : कापूस, सोयाबीन, महाराष्ट्रातील दुष्काळ याकडे महाराष्ट्र सरकारच लक्ष वेधले पाहिजे. नको त्या मुद्यांकडे सरकारचं लक्ष असते. खोके सरकार पक्ष फोडा, घर फोडा यातच ते व्यस्त असतात. सरकार सर्वसामान्य जनतेपासून, वास्तवतेपासून दूर आहे, अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
वर्ध्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समीर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे पुढे यांनी सरकारचा कंत्राटी पदभरतीचा जीआर काढल्याबद्दल निषेध नोंदविला. वाघ नख वगैरे करा पण, सोयाबीन, कपाशीवरही चर्चा करा. आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात, कपाशीला बारा हजार रुपये भाव देण्यास कटीबद्ध राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
२४ मृत्यूला ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, असे सांगत सरकारचा निषेध केला. या सरकारमध्ये कोण सुखी आहे, हे कुणाला माहिती आहे. राज्य सरकारने कंत्राटी पदभरतीचा जीआर काढल्याबद्दल निषेध केला. हे असंवेदनशिल सरकार असल्याची टीका सुळे यांनी केली.
वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित काम करण्याची संधी मिळाली तर आनंदच होईल. अर्थातच तो निर्णय संघटना ठरवेल. स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी नाही मिळाली तरी अनेक पद्धतीने आपण काम करू शकतो. वर्ध्यासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news