![औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामकरण : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F12%2F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला अखेर पूर्णविराम मिळाला असून अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यात औरंगाबाद शहराला "संभाजीनगर" आणि उस्मानाबाद शहराला "धाराशीव" असे नामकरणास मान्यता मिळाली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.