जिनिव्हा : पुढारी ऑनलाईन
गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून बाहेर पडून तो जगभरात पसरला असल्याची शंका अनेक देशांनी व्यक्त केला होती. पण आता या प्रकरणी जागतिक आऱोग्य संघटनेने चीनला क्लिनचीट दिली आहे.
वाचा : 'PM मोदींना ताम्रपट, पेन्शन द्यायला हवी'
कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतून नव्हे तर वटवाघुळापासून मनुष्यात आला, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने काढला आहे. याबाबतचा सविस्तर शोध अहवाल आज मंगळवारी अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे. पण त्यापूर्वीच हा शोध अहवाल लीक झाला आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
वाचा : 'वाझे सरकार अडचणीत आणेल हे आधीच सांगितले होते'
जगभरात कोरोनाने आतापर्यंत २८ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२ कोटींहून लोक कोरोनाने बाधित झाले आहेत. गेल्या १५ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे जगातील बहुतांश भागांत निर्बंध घालण्यात आलेत. याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
वाचा : वाझेने नष्ट केलेले पुरावे 'मिठी'त सापडले
कोरोनाचा विषाणू हा वटवाघुळापासून मनुष्यात आला असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाबाबतचा चौकशी अहवाल जारी करण्यासाठी कथितरित्या विलंब करण्यात आल्याने चीनची बाजू घेत निष्कर्षात बदल केला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वाचा :'सिंडिकेट'च्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न
कोरोना विषाणूबाबत सुरुवातीपासूनच सतर्कता राखली नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) जगभगरातून टीका होत आहे. यावरुन डब्ल्यूएचओने याधी मोठा खुलासा केला होता. वुहानमध्ये न्युमोनिया सारख्या प्रकरणाबाबत पहिल्यांदा चीनने नव्हे तर डब्ल्यूएचओच्या कार्यालयाने सूचना दिली होती, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.