![UN : ‘लादेनला आश्रय देणा-यांनी…’ काश्मीर प्रश्नावरून एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2FS-Jayshankar-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनालाइन डेस्क : UN : ज्या देशाने अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आश्रय दिला आणि त्याच्या शेजारील देशाच्या संसदेवर हल्ला केला, त्याला संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणतेही स्थान नाही, अशा शब्दांत परराष्ट्रामंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला जयशंकर यांनी बुधवारी चोख प्रत्युत्तर दिले.
UN : एस जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता आपल्या काळातील प्रमुख आव्हानांना प्रभावी प्रतिसाद देण्यावर अवलंबून असते, मग ती महामारी असो, हवामान बदल असो, संघर्ष असो किंवा दहशतवाद असो.
UN : युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) मध्ये 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि सुधारित बहुपक्षीयतेची नवी दिशा' या विषयावरील खुल्या चर्चेचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूषवले.
यावेळी ते म्हणाले की, आज आम्ही बहुपक्षीय सुधारणांच्या निकडीवर लक्ष केंद्रित करत आहोत. साहजिकच आमची स्वतःची विशिष्ट मते असतील, परंतु याला आणखी विलंब करता येणार नाही यावर किमान एकमत होत आहे.
UN : ते म्हणाले की, जग ज्याला अस्वीकार्य मानते, त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवू नये. हे निश्चितपणे सीमापार दहशतवादाच्या राज्य प्रायोजकत्वावर लागू होते. तसेच ओसामा बिन लादेनला होस्ट करणे आणि शेजारच्या देशाच्या संसदेवर हल्ला करणे हे या परिषदेसमोर प्रचार करण्यासाठी श्रेय म्हणून काम करू शकत नाही."
हे ही वाचा :