हवामान बदल सर्वांत मोठे आव्हान : मोदी 

Published on
Updated on

दावोस : पुढारी ऑनलाईन

स्विझर्लंडमधील जागतिक आर्थिक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदल, दहशतवाद आणि देशातील नागरिकांमध्ये असणारी आत्मकेंद्रित वृत्ती यावर अधिक भर दिला. या तिन्हीबाबींमुळे जगासमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हवामान बदल हे जगापुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे मतही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. 

भारताच्या विकासाचा दाखला देताना मोदी म्हणाले की, भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी १९९७ मध्ये दावोसमध्ये आयोजित परिषदेत सहभागी झाले होते. त् वेळी भारताचा जीडीपी सुमारे ४ मिलियन डॉलरच्या आसपास होता. सध्याच्या घडीला जीडीपीमध्ये तब्बल सहापट्टीने वाढ झाली आहे. 

मोदी म्हणाले, 'सध्याचे जग हे डेटाच्या विश्वात आहे. १९९७ मध्ये युरो चलन नव्हते. अॅमेझॉनचे नाव इंटरनेटवर शोधले असते तर तुम्हाला नदी किंवा पक्षांचे नाव सापडले असते. ट्विट करण्याचे काम  पक्षीच करत होते. मात्र आता काळ बदलला आहे. डेटाचा पर्वत बनत असून, त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. जो डेटावर नियंत्रण ठेवेल तोच जगात आपले वर्चस्व कायम राखेल, अशी परिस्थिती आहे.' 
वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणारे आव्हान अधिक गंभीर असल्याचे सांगत सर्वांनी एकत्रितपणे लढा देणे गरजेचे असल्याचे आवाहन देखील मोदींनी केले आहे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news