

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील काही भागात सोमवारी ४६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेत वाढ झाल्याने दिल्लीकर पुरते हैराण झाले आहे. सुर्याच्या कोपामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे दिसून आले.दरम्यान मंगळवारी उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी नजफगढ भागात ४६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली.