

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन खात्याने वापरातून बाद झालेल्या जुन्या फेरीबोटींचा नव्या पद्धतीने उपयोग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे तरंगते रेस्टॉरंटस् आणि डिजिटल नोमॅड वर्कस्पेसेसमध्ये रुपांतर करण्याचे ठरविले आहे.
या उपक्रमामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी पर्यटन खात्याने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.
राज्यातील जलमार्गाचा पर्यटनासाठी अधिक प्रभावी वापर करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. प्रस्तावानुसार, जुन्या फेरीबोटींचे रूपांतर आधुनिक सुविधा असलेल्या तरंगते रेस्टॉरंटस्, कॅफे, मनोरंजन केंद्रे तसेच डिजिटल नोमॅड्ससाठी कामकाजाच्या जागांमध्ये केले जाणार आहे.