पणजी पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी नसल्याने राज्यातील यंदा सात सरकारी प्राथमिक शाळा झाल्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या शाळांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. यापुढे चार विद्यार्थी असले तरीही या शाळा सुरू राहतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात दिली. (Goa news)
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत आहेत. यंदा ७ शाळा बंद पडल्या. २०१४-१५ मध्ये गोव्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या. आता ६८७ राहिल्या. या दहा वर्षांमध्ये १३५ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या. खाजगी शाळा विद्यार्थी आणि पालकांना विविध मार्गांनी आकर्षित करत आहेत. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बालरथांची व्यवस्थाही त्यांच्या- कडून केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्येस गळती लागली असून दिवसेंदिवस त्या कमी होत आहेत.
खाजगी शाळांची पर्यायी व्यवस्था असल्यामुळेच या शाळा बंद करायला लागत आहेत. आणि ज्या शाळांची पटसंख्या शून्य आहे त्याच शाळा बंद केल्या आहेत. यापुढे केवळ चार पटसंख्या असलेल्या शाळाही सुरूच राहतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.