

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
जलवाहतूक मार्ग गोव्यात अनेक ठिकाणी सुखकर होण्याच्या दृष्टीने सरकार वेगवेगळे प्रयत्न करीत असून, चढून रायबंदर जलमार्गावर रोरो फेरी घातल्याने अवघ्या १० मिनिटांत नदी पार करून लोकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.
सुमारे ५० हजार लोक फेरीतून प्रवास करत असल्याने त्यांना निश्चित दिलासा मिळत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी दुपारी चोडण मार्गेतून रो रो फेरीतून प्रवास केला. अनेकवेळा आपल्याला रो रो फेरी उपयुक्त ठरत असल्याने या भागातून जाणे पसंत कर्जाचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले जाते.
इतर मार्गावरही रोरो फेरी गाळण्याचा सरकारचा विचार असून त्याबाबत आवश्यक सोपस्कार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या जलमार्गावर जायक आहे. त्रुटी असतील तसेच काहीवेळा एखादी फेरी नादुरुस्त झाली तरी ती तातडीने आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सूचना दिलेल्या असल्याचे मुख्यमंत्री यावेळी सांगितले.