

किराणा सामान आणल्यावर त्याची योग्य साठवणूक महत्त्वाची असते. सामानामध्ये शेंगदाणे हा घटक हमखास असतो. उपवासाच्या पदार्थामध्ये त्याचे कूट आवर्जुन वापरले जाते. बदाम, काजू वेलदोडे यांची साठवणूक योग्य प्रकारे करणे आवश्यक असते, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांची साठवणूक करताना योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते.