Vat Purnima 2026: वटपौर्णिमा: सुवासिनींनो आज 'ही' व्रतकथा वाचा, मनातील इच्छा पूर्ण होईल!

वटपौर्णिमेला उपवासासोबत व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे आवश्यक मानले जाते. अशी श्रद्धा आहे की, व्रतकथा न ऐकता किंवा न वाचता केलेले व्रत अपूर्ण राहते.
Vat Savitri Vrat Katha
Vat Savitri Vrat KathaFile Photo
Published on
Updated on

Vat Savitri Vrat Katha

मुंबई: ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही 'वटपौर्णिमा' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुख-समृद्धीने बहरावे, यासाठी विवाहित महिला यादिवशी व्रत ठेवतात. सनातन परंपरेनुसार, वट पौर्णिमेचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते आणि या दिवशी व्रतकथा वाचणे किंवा ऐकणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, वडाच्या वृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे वास्तव्य असते. त्यामुळे विवाहित महिला विधीपूर्वक वडाची पूजा करतात, झाडाभोवती धागा गुंडाळून अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखासाठी प्रार्थना करतात.

Vat Savitri Vrat Katha
Vat Purnima 2023 | वटपौर्णिमा : जाणून घ्या वटपूजनाचा मुहूर्त आणि महत्व, शास्त्र काय सांगते?

वट पौर्णिमा व्रतकथा

पौराणिक कथेनुसार, सावित्री ही एक राजकन्या होती. तिचा विवाह सत्यवान नावाच्या राजपुत्राशी झाला होता. सावित्री ही राजा अश्वपती यांची कन्या, तर सत्यवान हा राजा द्युमत्सेन यांचा पुत्र होता.

विवाहापूर्वी नारद मुनींनी सावित्रीच्या वडिलांना सांगितले होते की, सत्यवान अत्यंत गुणी, धर्मनिष्ठ आणि सद्गुणी असला तरी त्याचे आयुष्य अल्प आहे. विवाहानंतर अवघ्या एका वर्षात त्याचा मृत्यू होणार असल्याचे त्यांनी भाकीत केले होते. मात्र, वडिलांनी समजावून सांगूनही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने सत्यवानाशी विवाह केला.

विवाहानंतर सावित्री पतीसोबत वनात राहू लागली. सत्यवानाच्या अल्पायुष्याची आठवण होताच तिने कठोर उपवास, व्रत आणि तपश्चर्या सुरू केली. निर्धारित दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला असता सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काम करताना अचानक सत्यवानला तीव्र वेदना जाणवू लागल्या. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. त्याच वेळी यमराज तेथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले.

मात्र, सावित्रीने हार मानली नाही. ती यमराजांच्या मागे-मागे चालत राहिली. तिची पतीप्रती अटळ निष्ठा, समर्पण आणि पतिव्रतेचे सामर्थ्य पाहून यमराज प्रसन्न झाले आणि तिला वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने पतीचे प्राण परत मिळण्याचा वर मागितला. वचनबद्ध असल्याने यमराजांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. त्यानंतर सावित्री वडाच्या झाडाखाली परतली, जिथे सत्यवानाचे शरीर पडले होते. प्राण परत मिळताच सत्यवान पुन्हा जिवंत झाला.

तेव्हापासून वट पौर्णिमेचे व्रत अखंड सौभाग्य, पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रद्धेने पाळले जाऊ लागले. अशी मान्यता आहे की, या दिवशी भक्तिभावाने वट पौर्णिमेचे व्रत आणि व्रतकथा केल्यास श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात.

Vat Savitri Vrat Katha
Nirjala Ekadashi 2026: भगवान विष्णूंच्या आवडत्या 'या' 4 राशींचे नशीब पालटणार? आज निर्जला एकादशीपासून सुरू होणार सुवर्णकाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news