2050 सालापर्यंत मानव प्रजाती कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानवांमुळे नष्ट होईल, असा धक्कादायक दावा नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या जेफ नेस्बिट यांनी केला आहे. येत्या तीस वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानव किंवा यंत्रांचे प्रस्थ एवढे वाढेल की मानव जातीला बुद्धी वापरावी एवढे काम उरणार नाही व मानव प्रजाती हळूहळू नष्ट होईल, असा दावा नेस्बिट यांच्या लेखात केला आहे. मानवाने निर्माण केलेले यंत्रमानव मानवाचेच आदेश
मानण्याचे सोडून देतील व स्वत:च निर्णय घेतील. जे अंतिमत: मानवजातीला धोकादायक असतील. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता नियंत्रित स्वरूपात उपकारक आहे, हेही त्यांनी सांगितले आहे.