आजपासून पितृपक्ष प्रारंभ: जाणून घ्या महत्व आणि श्राद्ध करण्याचे नियम | पुढारी

आजपासून पितृपक्ष प्रारंभ: जाणून घ्या महत्व आणि श्राद्ध करण्याचे नियम

पुढारी ऑनलाइन डेस्क : हिंदू धर्मात पितृपक्षाला मोठे महत्व आहे. आपल्या पितरांना किंवा पूर्वजांना श्राद्ध टाकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवाडा पितृपक्ष म्हणून मानला गेला आहे. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. या काळात लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा 9/10 सप्टेंबरला आली आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला प्रारंभ होत आहे. 25 सप्टेंबर पर्यंत सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष समाप्त होईल.

पितृपक्षाच्या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांची पूजा करतात. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. श्राद्ध म्हणजे भक्तीभावाने केलेला विधी, ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. असे म्हटले जाते की पितृ पक्षादरम्यान, सर्व पूर्वज पृथ्वीच्या जगात राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात.

पितृ पक्षादरम्यान, पूर्वज त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण किंवा पिंड दान इत्यादी करण्याची अपेक्षा करतात, कारण ते या कृतींनी संतुष्ट होतात. तृप्त झाल्यावर मुलांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जगात परत जातात. परंतु असे अनेक नियम आहेत, जे पितृ पक्षात पाळणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये.

ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षात पितरांचे स्मरण केले पाहिजे. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा.

तर्पण करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश पाण्यात मिसळून पितरांना तर्पण अर्पण करावे. कुशचा वापर केल्याने पितर लवकर तृप्त होतात असे मानले जाते. पितृ पक्षात दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे त्यांचे आत्मे लवकरच तृप्त आणि धन्य होतात.

धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. हिंदू धर्मात असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते.

पितृपक्षात काय करू नये?

धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. यामुळे पितरांना राग येतो. तसेच पितृ पक्षाच्या काळात आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. यामुळे पितरांचा राग येतो आणि पितृदोष होऊ शकतो.

पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करायचे नसते. जसे की साखरपूडा, लग्न, नामकरण सोहळा असे कार्य पितृ पक्षात करणे वर्ज्य मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की पितृ पक्षात शुभ कार्य केल्याने त्याचे चांगले फळ मिळत नाही.

हे ही वाचा:

‘भाद्रपद पौर्णिमा’ : समृद्ध होण्यासाठी आज ‘हे’ व्रत करा, जाणून घ्या महत्व

‘भाद्रपद पौर्णिमा’ जाणून घ्या तिथी-महत्व आणि व्रताची माहिती

Back to top button