अक्षरे, आकडे शिकण्याबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. प्रयोगशील शिक्षिका, बालविकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण कल्पना, पद्धतींचा उपयोग करण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. अनोख्या पद्धतींचा वापर करून राज्यभरातील शिक्षकांना इंग्रजीच्या अध्यापनाचे शिक्षण त्या द्यायच्या. राज्य सरकारच्या पहिलीपासून इंग्रजी या प्रकल्पाचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.