

बंगळूर : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या मतदार यादी सुधारणेमध्ये (एसआयआर) आपली नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. अन्यथा ज्यांची नावे मतदार यादीत नसतील, त्यांना हमी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत विहीत नमुन्यात स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा तपशील भरून मंगळवारपासून एसआयआर प्रक्रियेचा आरंभ केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बिहार व पश्चिम बंगालमध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांची नावे सरकारी लाभ योजनेतून कमी केली जात आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातही ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांना हमी योजना मिळू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी आपली नावे एसआयआरमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.