बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक वाढली असून सध्या १ लाख ४३ हजार ७५० क्युसेक पाणी येत आहे. तर धरणातून १ लाख ४२ हजार ९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
जलाशयात आता ५१७. ७२ मीटर म्हणजेच ९३. ८१० टीएमसी पाणीसाठा आहे. दोन दिवसांपासून जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.