खानापूर : सोमवारी रात्रभर कोसळलेल्या संततधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड मार्गावरील हालात्री नाल्याचा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सहा फूट पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने आज (दि. २३) सकाळपासून या मार्गावरील खानापूर-गोवा वाहतूक ठप्प झाली आहे.
गोव्याला बेळगावशी जोडणारे इतर तीनही रस्ते खराब झाल्याने प्रवासी वाहने खानापूर-हेमाडगा-अनमोड मार्गाचा अवलंब करतात. सोमवारी दिवसभर हालत्री पूल खुला झाला होता. रात्रीपासून संततधारेत वाढ झाल्याने आज दिवसभर हा पूल पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेमाडगा भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.