निपाणी; पुढारी वृत्तसेवा : 'अधिकारी आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत कुन्नूर (ता. निपाणी) येथे शनिवार[ (दि. १९ रोजी) बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे एक दिवस ग्राम वास्तव्य होणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी दिली.
सदर उपक्रमांतर्गत सर्व शासकीय खात्याचे अधिकारी कुन्नूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उपस्थित राहणार आहेत. हे सर्व अधिकारी नागरिकांच्या समस्यांची ताबोडतोब उकल करणार आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपल्या समस्या असतील तर त्या लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांकडे आणून द्याव्यात, असे आवाहन तहसीलदार डॉ. भस्मे यांनी केले आहे.
हेही वाचलंत का?
video : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट