बेळगाव : मुलीच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, तवंदी घाटात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

बेळगाव : मुलीच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, तवंदी घाटात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार
Published on
Updated on

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील जारजण जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण लग्नासाठी चालले होते. मृतांमध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू, आजी यांचा समावेश आहे.

हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला. छाया आदगोंडा पाटील (वय 55 ), आदगोंडा बाबू पाटील (वय 55,) महेश देवगोंडा पाटील (वय 23,) चंपाताई मगदूम (वय 80) रा. बोरगाववाडी ता. निपाणी अशी मृत चौघांची नावे आहेत. कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरच्या धडकेत कारमध्ये अडकून पडलेल्या चार जणांना पोकलेनच्या साह्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातानंतर तासभर मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अपघातातील मृत सर्वजण स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी जात होते. अपघातामध्ये नवरी मुलगीच्या महेश या भावाचा समावेश आहे. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे.

हे ही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news