विशाखापट्टणम बंदरात 40 बोटी जळून खा
विशाखापट्टणम बंदरात 40 बोटी जळून खा

आंध्र प्रदेश: विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, ४० हून अधिक बोटी जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू

Published on

अमरावती; पुढारी ऑनलाईन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात काल (रविवार) रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा ही आग लागली असून पोलिस-अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग किती भीषण होती, याचा अंदाज यावरून येताे की, आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. दरम्‍यान या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news