Vishal Bajirao Ubale
कधी बातम्यांमध्ये ऐकलंय का की मेघालयमध्ये मोठा पूर आला? नाही ना! आणि गंमत म्हणजे देशात सर्वात जास्त पाऊस तिथेच पडतो.
चेरापूंजी, मावसिनराम हे जागतिक पावसासाठी प्रसिद्ध ठिकाण आहेत. पण तरीही लोकांचं दैनंदिन आयुष्य फारसं विस्कळीत होत नाही.
मेघालयमधले डोंगर सरळ उताराचे आहेत. पाऊस पडला की पाणी थांबत नाही, लगेच खाली वाहून जातं.
या डोंगरांमध्ये बारीक-बारीक फटी आहेत. त्या फटींमधून पाणी थेट जमिनीत उतरून जातं.
मेघालयचे धबधबे खूप सुंदर आहेत, पण ते पाण्याचा प्रवाह सांभाळण्यासाठीही कामी येतात. पाऊस खूप झाला की हे धबधबे पाणी खाली खेचून नेतात. जणू निसर्गानेच त्यांना हे काम दिलंय असं वाटतं.
देशातील अनेक शहरांमध्ये पूर येतो कारण पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग नसतो.
मीठी नदी कधीकाळी खरी नदी होती, नाला नव्हता. तेव्हा मच्छीमार तिथे मासे पकडायचे. कचऱ्यामुळे नदीला जागा राहिली नाही. सांडपाणी, कचरा आणि अतिक्रमण यामुळे ही नदी गटारसारखी झाली. मग थोडा पाऊस पडला तरी पूर येतो.