पुढारी वृत्तसेवा
ऊसाचा रस घेताना तुम्ही पाहिलंय का की, त्यात लिंबू आणि अननस घालतात. यामागे काय कारण आहे.
लिंबू आणि अननस दोन्ही पचनास मदत करतात. अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाइम असते जे प्रथिने पचवण्यास मदत करते. तर लिंबू पचनसंस्थेतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं.
ऊस शरीराला थंडावा देतो. अननस पचन सुधारतो. त्यामुळे दोघांचं मिश्रण हेल्दी असतं.
लिंबू आणि अननस हे दोन्ही घटक व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
अननसातील ब्रोमेलिन शरीरातील सूज कमी करतं. म्हणूनच जखम भरायला, अंगदुखी कमी व्हायला मदत होते.
अननसमध्ये मँगनीज भरपूर असतं. हे हाडांची घनता वाढवतं आणि सांधेदुखीत आराम देतं.
अननसातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात. म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
अननस कमी कॅलरीजचं फळ आहे. फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. ऊसाच्या रसात घातल्यावर ऊर्जा मिळते, चरबी वाढत नाही.
अननस जास्त प्रमाणात खाल्ल्यास जिभेला खाज, ॲसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते. म्हणून नेहमी मर्यादित सेवन करा.
ऊसाचा रस हा नैसर्गिकरित्या लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यात लिंबू घातल्याने लघवीच्या जागी होणारी जळजळ किंवा यूटीआय सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.