पुढारी वृत्तसेवा
कडक उन्हाळ्यात अनेकांना वारंवार तहान लागते. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे घाम जास्त येतो. घामाद्वारे पाणी आणि क्षार दोन्ही बाहेर पडतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यालाच निर्जलीकरण म्हणतात.
आपण तहान लागली की पाणी पितो. पण घामावाटे गेलेले खनिजे (Electrolytes) भरून निघत नाहीत. म्हणून पुन्हा तहान लागते.
सोडियम, पोटॅशियम यांसारखे क्षार शरीरासाठी महत्त्वाचे असतात. घामामुळे हे घटक कमी होतात. म्हणून मेंदू तहान लागल्याचे संकेत देतो.
कॅफिन असलेली पेये शरीरातील पाणी कमी करू शकतात. चहा, कॉफी किंवा साखरयुक्त शीतपेये डिहायड्रेशन वाढवतात. यामुळे तहान अधिक लागते.
काही वेळा लोक खूप जास्त पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते.
त्याला Water Toxicity असे म्हणतात.
फक्त पाणी न पिता इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पेये घ्या. नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील क्षार वाढतात.