पुढारी वृत्तसेवा
ओलावा हे मुख्य कारण
कोथिंबीर लवकर खराब होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे पानांमध्ये साठलेला ओलावा.
धुतल्यानंतर न वाळवणे
धुतलेली कोथिंबीर नीट कोरडी न केल्यास लवकर खराब होती
प्लास्टिक पिशवीत ठेवणे
प्लास्टिकमध्ये हवा खेळत नाही, त्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
फ्रिजमधील थंडावा
फ्रिजमध्ये ओलावा जास्त असल्यास कोथिंबीर लवकर काळी पडते.
हवा न मिळाल्याने खराब होते
हवा खेळती न राहिल्यास पानांमध्ये बुरशी तयार होते.
आधीच खराब पानांसोबत ठेवणे
एक जरी सडलेले पान असेल तरी संपूर्ण कोथिंबीर खराब होते.
वारंवार हाताळणे
सतत हात लावल्याने ओलावा आणि घाण पानांवर जाते.
चुकीचा डबा वापरणे
पूर्ण बंद डब्यात कोथिंबीर ठेवल्याने लवकर खराब होती.
योग्य पद्धत वापरल्यास टिकते ताजी
कोथिंबीर कोरडी करून कागदात गुंडाळल्यास ती जास्त दिवस ताजी राहते.