Rahul Shelke
खुसखुशीत, गरमागरम बटाट्याचा पराठा म्हणजे अनेकांसाठी दिवसाची परफेक्ट सुरुवात.
पण रोज खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
बटाट्याच्या पराठ्यात कर्बोदकं (Carbohydrates) जास्त असतात. खाल्ल्यानंतर शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि काही वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
पराठा खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा धोका ठरू शकतो.
रोज पराठा खाल्ल्यास लठ्ठपणा, टाईप-2 डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांचं शरीर ही ऊर्जा वापरू शकत नाही. अतिरिक्त कॅलरीज थेट चरबीच्या स्वरूपात साठतात.
सकाळी पराठा खाल्ल्यावर काही तासांनी थकवा, सुस्ती किंवा पुन्हा भूक लागू शकते.
दह्यामुळे प्रोटीन मिळतं, भाज्यांमुळे फायबर वाढतं. यामुळे पचन हळूहळू होतं आणि साखर नियंत्रणात राहते.
जास्त तूप/लोणी घातल्यास कॅलरीज आणि चरबी वाढते. यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
या लोकांनी रोज पराठा खाणे टाळावे - मधुमेह असलेले, हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल असलेले, पचनाच्या तक्रारी असलेले
आठवड्यात 1–2 वेळा, कमी तेलात बनवलेला पराठा चालतो. दही, सलाड, भाज्यांसोबत खाल्ल्यास तो आरोग्यदायी ठरू शकतो.