Rahul Shelke
आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्याचा असतो. ते शरीरातील तापमानाचं संतुलन राखतं आणि घाण बाहेर काढायला मदत करतं.
तुम्ही खूप घाम गाळत असाल, व्यायाम करत असाल किंवा उष्ण ठिकाणी राहत असाल
तर 3 लिटर पाणी शरीरासाठी उपयोगी ठरू शकतं.
30 दिवस पुरेसं पाणी पिल्यावर त्वचा अधिक हायड्रेटेड दिसू शकते. कोरडेपणा आणि निस्तेजपणा कमी होऊ शकतो.
कधी कधी पाणी कमी पिल्यामुळे डोकेदुखी वाढते. पाणी नियमित घेतलं तर अशा दुखण्यांमध्ये आराम मिळू शकतो.
पाणी पुरेसं घेतल्याने पचन हलकं होतं आणि बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) कमी होण्यास मदत होते. मलावरोधाचा त्रास कमी होऊ शकतो.
पाणी जास्त प्यायल्यामुळे किडनीमध्ये खडे होण्याचा (स्टोन) धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
तुम्ही कमी हालचाल करत असाल, थंड/मध्यम हवेत राहत असाल तर 3 लिटर पाणी जास्त होऊ शकतं. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं.
जास्त पाणी पिलं किंवा पटकन खूप जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील मीठ (सोडियम) कमी होऊ शकतं. यामुळे मळमळ, चक्कर, क्रॅम्प्स आणि झटकेही येऊ शकतात.
तहान लागल्यावरच प्या, पाणी हळूहळू प्या, हवामान/व्यायामानुसार प्रमाण वाढवा-कमी करा. आजारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.