पुढारी वृत्तसेवा
२०२६मध्ये मैदानावर धमाल करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा सज्ज आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली.
विराट एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला.
यंदाच्या वर्षात भारतीय संघ २१ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांचेही लक्ष्य २०२७ च्या वनडे विश्वचषक जिंकणे आहे.
दोघेही यावर्षी २१ सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अनुभवी विराट आणि रोहित टीम इंडियासाठी प्रमुख फलंदाज आहेत, ते स्वतःच्या बळावर सामने जिंकण्यास सक्षम आहेत.
वनडे सामन्याबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही आयपीएलच्या १९ व्या हंगामात वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसतील.