पुढारी वृत्तसेवा
तुळशीच्या पानांचे पाणी घरात शिंपडणे अत्यंत पवित्र व लाभदायक मानले जाते.
तांब्याच्या/पितळेच्या पात्रात स्वच्छ पाणी घेऊन त्यात ७ ते ११ तुळशीची पाने १०-१५ मिनिटे भिजू द्यावीत.
पूजेनंतर/संध्याकाळी तुळशीच्याच पानांचा वापर करून हे पाणी घरात, मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे.
तुळशीच्या पाण्याच्या सिंचनाने घरातील नकारात्मकता दूर होते
घरात सकारात्मक लहरींचा प्रवाह वाढतो
हे पाणी शिंपडल्याने हवेतील सूक्ष्म कीटाणू नष्ट होऊन घरातील वातावरण निरोगी राहते.
तुळशीच्या नैसर्गिक सुगंधामुळे मानसिक ताण कमी होतो
वास्तुदोष, नजरदोष दूर करण्यासाठी हे पाणी अत्यंत प्रभावी मानले जाते.