Rahul Shelke
राजकीय वादानंतर टीपू सुलतानचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने हा वाद वाढला.
टीपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात मैसूर राज्यावर राज्य केले. त्यांची राजधानी श्रीरंगपट्टणम (आजचा कर्नाटक) येथे होती. ते ब्रिटिशांविरुद्ध लढले होते.
त्यांच्या कारकिर्दीत साम्राज्याचा विस्तार मुख्यतः दक्षिण भारतात होता. आजचे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचे मोठे भाग त्यांच्या ताब्यात होते.
टीपू सुलतानची उत्तरेकडील सत्ता कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशापर्यंत पोहोचली होती. धरवाड, गजेंद्रगड आणि बेल्लारीसारखे भाग त्यावेळी त्यांच्या प्रभावाखाली होते.
इतिहासानुसार टीपू सुलतानने आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश भागावर थेट राज्य केले नाही. त्या काळात महाराष्ट्र मराठा साम्राज्याच्या ताब्यात होता.
टीपू सुलतान आणि मराठा साम्राज्य यांच्यात अनेक युद्धे झाली. या लढायांना “मराठा–मैसूर संघर्ष” असे म्हटले जाते. सीमावर्ती किल्ल्यांवरून वाद होत असत.
नरगुंड, बादामी आणि अदोनी या भागांमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमकी झाल्या. हे भाग दक्षिण आणि पश्चिम भारतातील व्यापारमार्गांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
आजच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील काही भागांत संघर्ष झाला होता. मराठवाड्यातील काही प्रदेशांमध्ये सैनिकी हालचालींचे उल्लेख सापडतात.
हिंगोलीसारख्या भागांमध्ये त्या काळातील लढायांचा अप्रत्यक्ष परिणाम दिसून येतो. नंतर या काही भागांवर हैदराबादच्या निजामांचे नियंत्रण आले.
टीपू सुलतानची सत्ता मुख्यतः दक्षिण भारतात होती. महाराष्ट्रावर थेट राज्य नव्हते, पण सीमावर्ती भागांमुळे ऐतिहासिक संबंध आणि संघर्ष नक्कीच होता.