पुढारी वृत्तसेवा
आज ‘जय भीम’ हा फक्त शब्द नाही… तो ओळख आहे, अभिमान आहे आणि एक विचार आहे.
कोट्यवधी लोक एकमेकांना ‘जय भीम’ म्हणत अभिवादन करतात. पण हा शब्द इथपर्यंत कसा पोहोचला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव. त्यांच्या स्मरणार्थ ‘जय भीम’ हा नारा जन्माला आला.
१९३५ साली ‘जय भीम’ हा नारा दिला गेला. आणि एका शब्दाने चळवळीला नवी दिशा मिळाली.
हा नारा दिला बाबू हरदास यांनी. ते बाबासाहेबांचे निष्ठावान सहकारी होते.
काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे आंदोलनात बाबू हरदास सहभागी होते.
समता सैनिक दलाने गावोगावी समतेचा विचार पोहोचवला. ‘जय भीम’ हा त्यांच्या ओळखीचा आवाज बनला.
‘जय भीम’ हे फक्त अभिवादन राहिले नाही… तो चळवळीचा नारा बनला आहे.
महाराष्ट्रात सुरु झालेला हा जयघोष आज संपूर्ण भारतात आणि परदेशातही पोहोचला आहे.
‘जय भीम’ म्हणजे फक्त शब्द नाही… तो समानतेचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतीचा आवाज आहे.