डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

समाज बदलण्याची ताकद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त कायदेच नाही तर विचारांचीही क्रांती घडवली. त्यांच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद होती.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

वंचितांचा आवाज

त्या काळात वंचित समाजाचा आवाज कुठेच ऐकू येत नव्हता. बाबासाहेबांनी पत्रकारितेला शस्त्र बनवलं.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

मूकनायक: मूकांना मिळाला आवाज

१९२० साली सुरू झालेलं ‘मूकनायक’ हे त्यांचं पहिलं पाक्षिक. ज्यांचा आवाज दाबला गेला होता, त्यांचं व्यासपीठ बनलं.

Mooknayak | Pudhari

बहिष्कृत भारत (१९२७): अन्यायाविरुद्ध लढा

बहिष्कृत समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं. हा फक्त पेपर नव्हता, तर आंदोलन होतं.

Bahishkrit Bharat | Pudhari

समता (१९२८): समानतेचा संदेश

‘समता’मधून त्यांनी समतावादी समाजाची संकल्पना मांडली. सामाजिक सुधारणांचा जोरदार प्रचार केला.

Samata | Pudhari

जनता (१९३०): चळवळीचा दस्ताऐवज

'जनता’ हे वृत्तपत्र अनेक वर्षे चाललं. आंबेडकर चळवळीचा इतिहास इथे जिवंत राहिला.

Janata | Pudhari

प्रबुद्ध भारत (१९५६): विचारांचा शेवटचा दीप

४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू झालेलं हे त्यांचं शेवटचं वृत्तपत्र. प्रबुद्ध समाजाच्या दिशेने वाटचाल दाखवणारा दीप.

Prabuddh Bharat | Pudhari

मराठी भाषेतून समाज जागवला

ही सर्व वृत्तपत्रे प्रामुख्याने मराठीतून प्रकाशित होत होती. मराठी भाषा ही समाज परिवर्तनाचं माध्यम बनली.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

पत्रकारिता = सामाजिक क्रांती

बाबासाहेबांसाठी पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या नव्हत्या. ती होती सामाजिक न्यायासाठीची लढाई.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती पुस्तके लिहिली? तुम्हाला माहितेय का?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा