Rahul Shelke
भारत–दक्षिण आफ्रिकेचा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द झाला. स्टेडियम भरलेलं होतं, पण एकही चेंडू खेळला नाही.
अशा वेळी लोकांच्या मनात एक प्रश्न येतो. इतकं मोठं आर्थिक नुकसान कोण भरून काढतं?
आज क्रिकेट फक्त खेळ राहिलेला नाही. तो कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
म्हणून प्रत्येक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना विम्यात कव्हर असतो. BCCI, टीव्ही कंपन्या आणि आयोजक मिळून विमा काढतात.
एका मोठ्या टी-20 सामन्याचा विमा अनेक कोटी रुपयांचा असतो. सामना किती महत्त्वाचा आहे यावर रक्कम ठरते.
जर सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला. तर विम्याचा क्लेम केला जाऊ शकतो.
विम्याचे पैसे प्रामुख्याने टीव्ही कंपन्यांना मिळतात. कारण त्यांनी आधीच मोठा खर्च केलेला असतो.
खेळाडूंचाही स्वतंत्र विमा काढलेला असतो. दुखापत झाली तर त्याचे नुकसान भरून दिले जाते.
IPL सारख्या स्पर्धांमध्ये विम्याची रक्कम हजारो कोटींमध्ये असते. धोका मोठा असल्यामुळे विमा फार महत्त्वाचा असतो.
प्रेक्षकांसाठी नियम सोपा आहे. सामना न खेळता रद्द झाला तर तिकिटाचे पैसे परत मिळतात.