पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि पचनसंस्था सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे ऋतूत थंड प्रकृतीच्या आणि पाणीदार भाजांचे सेवन करा!
काकडी: यात सुमारे ९५% पाणी असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी ही सर्वोत्तम आहे.
दुधी भोपळा: पचायला अतिशय हलका आणि थंड असतो. उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतो.
दोडका आणि पडवळ: या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते आणि त्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.
कारले: चवीला कडू असले तरी उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हे गुणकारी आहे.
भेंडी: ही उन्हाळ्यातील मुख्य भाजी आहे. यात प्रथिने आणि फायबर चांगले असते.
तोंडली आणि गवार: या हंगामी भाज्या उन्हाळ्यात सहज उपलब्ध होतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.
पालक: पालकामध्ये पाणी आणि लोह भरपूर असते, जे उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यास मदत करते.
माठ आणि तांदुळजा: या भाज्या उन्हाळ्यात खाणे पित्तशामक मानले जाते, त्याचबरोबर पुदिन्याचे सेवन शरीराला आतून थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतो.