हिरवी मिरची कापल्यावर हाताची आग का होते? 'हे' आहेत ८ प्रभावी उपाय

मोनिका क्षीरसागर

मिरची कापल्यावर हाताची होणारी आग (जळजळ) ही अनेकांना होणारी सामान्य समस्या आहे.

या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे मिरचीतील 'कॅप्सैसीन' (Capsaicin) नावाचा घटक.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कापण्यापूर्वी हात आणि मिरचीवर थोडे खाद्यतेल (cooking oil) लावावे.

तेल लावल्यामुळे कॅप्सैसीन त्वचेत शोषले जाण्यापासून रोखले जाते.

हाताची आग कमी करण्यासाठी तुम्ही थेट थंड दूध किंवा दही वापरू शकता.

डेअरी उत्पादनांमधील फॅट (चरबी) आणि प्रथिने (प्रोटीन्स) कॅप्सैसीनचा प्रभाव निष्क्रिय करतात.

याशिवाय, बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट बनवून हाताला लावल्यानेही आराम मिळतो.

आग शांत झाल्यावर हाताला मॉईश्चरायझर (Moisturizer) लावा आणि जळजळ पूर्णपणे थांबवा.

येथे क्लिक करा...