पुढारी वृत्तसेवा
केवळ गोडच नव्हे, तर मोठे किंवा जड जेवण केल्यानंतरही झोप येणे सामान्य आहे. वैद्यकीय भाषेत याला postprandial somnolence म्हणतात
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोप येणे अनेकांना जाणवते. मात्र वारंवार, तीव्र किंवा खूपच अचानक झोप येत असेल, तर त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे
मिठाई, पेढे, जिलबी, लाडू, केक, बिस्किटे, शीतपेये किंवा इतर साखरयुक्त पदार्थांमध्ये साधे कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. ते पचून ग्लुकोजमध्ये रूपांतरित झाल्याने रक्तातील साखर वाढते
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वादुपिंडातील इन्सुलिनमुळे ग्लुकोज शरीरातील पेशींमध्ये जाण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे जेवल्यानंतर झोप येऊ शकते
जेवणानंतरची सुस्ती आणि शरीराच्या जैविक घड्याळातील दुपारच्या वेळची नैसर्गिक झोपाळू अवस्था. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर लगेच झोप येते
गोड खाल्ल्यावर झोप येणे हे मधुमेह असे सरळ समीकरण नाही. साखरयुक्त जेवण आणि पचनानंतर होणाऱ्या शरीरातील बदलामुळे असे होऊ शकते
रक्तातील ग्लुकोज व इतर चयापचयातील बदल आणि मेंदूतील जागरूकतेशी संबंधित प्रक्रियांमध्ये होणारे बदलामुळे जास्त कॅलरीचे जेवण केल्यावर सुस्ती अधिक येऊ शकते
कधीतरी मिठाई किंवा भरपेट जेवणानंतर झोप येणे साधारणपणे चिंतेची बाब नाही. परंतु काही गोष्टी वारंवार होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर झोप येणे हे प्रत्येक वेळी मधुमेहाचे लक्षण असेल असे नाही. त्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात, ती समजून घेणे महत्त्वाचे ठरते