पुढारी वृत्तसेवा
राज्य जिंकणं पुरेसं नसतं… ते टिकवणं, वाढवणं आणि प्रजेला सुखी ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. म्हणूनच शिवरायांनी उभारलं एक मजबूत आणि विश्वासू अष्टप्रधान मंडळ.
मोरो त्रिंबक पिंगळे हे शिवरायांचे प्रधान होते. संपूर्ण राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हातात होती. महाराजांचे ते मुख्य सल्लागार होते.
रामचंद्र नीळकंठ मुजुमदार अमात्य म्हणून राज्याचा जमाखर्च पाहत. स्वराज्याचा खजिना, महसूल, उत्पन्न आणि खर्च यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे.
हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे सेनापती होते. सैन्याचे नेतृत्व करणे, रणांगणात पराक्रम गाजवणे आणि सैनिकांमध्ये शिस्त राखणे ही त्यांची जबाबदारी होती.
मोरेश्वर पंडितराव धार्मिक कार्यांची जबाबदारी सांभाळत. धर्मादाय कामे, दानधर्म आणि धार्मिक विषयांवरील मार्गदर्शन ते करत.
निराजी रावजी न्यायाधीश म्हणून कार्य करत. प्रजेचे वाद-विवाद सोडवून न्यायदान करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती.
अण्णाजी दत्तो सचिव म्हणून सरकारी आज्ञापत्रे तयार करत आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळत.
दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री म्हणून राज्यातील पत्रव्यवहार आणि नोंदी सांभाळत. राज्यातील घडामोडींची माहिती ठेवणे आणि योग्य ती नोंद करणे ही त्यांची जबाबदारी होती.
रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत म्हणून परराज्यांशी संबंध ठेवत. तह, चर्चा आणि राजनैतिक व्यवहार ते सांभाळत.
शिवरायांनी या मंत्र्यांना इनाम किंवा जहागिरी दिली नाही; त्याऐवजी भरघोस रोख पगार दिला. या सुजाण अष्टप्रधानांमुळेच हिंदवी स्वराज्य अधिक बळकट झालं.