दिवाळीचा फराळ तळल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरावे का? तज्ज्ञ काय सांगतात

मोनिका क्षीरसागर

दिवाळीचे खाद्यपदार्थ बनवून झाल्यानंतर, प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, उरलेल्या तेलाचे (Reuse Of Cooked Oi) करायचे काय?

काही गृहिणी उरलेले तेल पुन्हा भाजीआमटीला वापरतात, त्याच तेलात पुन्हा पुन्हा दुसरे खाद्यापदार्थात तळतात, तर काहीजणी ते सरळ फेकून देतात.

FSSAI च्या गाईडलाइननुसार, एकदा वापरलेले तेल हे शक्यतो खाण्यासाठी वापरूच नये. आरोग्याच्या दृष्टीने हे तेल जास्तीत जास्त ३ वेळाच वापरणे योग्य आहे.

एकदा पदार्थ या तेलात तळल्यानंतर तेलाचे अनेक गुणधर्म बदलतात. यामध्ये विषारी संयुगांची निर्मिती होते जी संयुगे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

तेलात तयार झालेल्या विषारी घटकांमुळे यकृताचा आजार, उच्च रक्तदाब, हदयासंबंधी आजार यांसारखे भयंकर आजार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दिवाळीमध्ये खाद्यपदार्थ तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा (Reuse Of Cooked Oi) वापर हा टाळावाच, हे शक्य नसल्यास कमीत कमी ३ वेळाच या तेलाचा वापर करता येऊ शकतो.

येथे क्लिक करा...