पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात दिवाळीचा सण अतिशय खास मानला जातो.
या दिव्यांच्या रात्री केलेले काही उपाय अत्यंत शुभ फलदायी मानले जातात.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध देशी तुपाचा सात किंवा नऊ वातींचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
यामुळे घरात धनवृद्धी, आरोग्य लाभ आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.
हा दिवा पूजास्थळी किंवा मुख्य दरवाजावर ठेवावा. तुपाची आणि कापसाची वात वापरणे अधिक शुभ फल देते.
दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी पाच कवड्या, पाच कमळाच्या बिया आणि थोडी पिवळी मोहरी लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एका पिशवीत ठेवा.
पूजेच्या वेळी ही पिशवी देवी लक्ष्मीच्या चरणांवर ठेवावी.
दुसऱ्या दिवशी ही पिशवी आपल्या तिजोरीत ठेवावी. यामुळे धन-संबंधी अडचणी दूर होतात.
दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला मखान्याच्या खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास तिची विशेष कृपा प्राप्त होते. यामुळे घरात कधीही धन-संपत्तीची कमतरता भासत नाही.
ही माहिती केवळ पौराणिक कथा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.